Saturday, 17 December 2011

असे मित्र पुन्हा होणे नाही भाग -१(शंभू राजे आणि कवी कुलेश )


           माणसाच्या आयुष्यात मित्र नाहीत असा माणूस सापडणे कठीण असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. प्रत्तेक माणसाच्या आयुष्यात मित्र असतोच. जीवनाच्या प्रत्तेक वाटेवर एक नवीन मित्र भेटतो.तसे म्हटले तर मित्रांचे तीन प्रकार होतात.
१)सुखात सहभागी होणारे मित्र - अश्या मित्रांची संख्या माणसाच्या जीवनात फार असते. असे मित्र रोज भेटतात, पण संकटकाळी पळून जातात.असे मित्र वैयक्तिक स्वार्थी असतात.ते तुमच्याकडून आपला जास्तीत जास्त फायदा कसा होईल हे पाहतात
२)सुख आणि दुखात सामील होणारे मित्र - काही मोजके मित्र सुखात तर सहभागी होतातच पण दुखातही साथ सोडत नाहीत, आणि असे मित्र जर भिन्न लिंगी असतील ( म्हणजेच त्री-पुरुष ) असतील तर ते पुढे जाऊन जीवन साथी  बनतात आणि शेवटपर्यंत एक मेकांची साथ देतात. असे मित्र निस्वार्थी असतात पण त्यांना ओळखणे फार कठीण असते हि माणसे आपण केलेले कोणतेही काम तुम्हाला दाखून देत नाहीत किवा त्याचे श्रेय हि घेत नाहीत.
३)मरणात हि सोबत असणारे मित्र
- आता तुम्ही म्हणाल असे मित्र कुठे आम्ही ऐकले नाही हो! पण असे मित्र असतात, जे शंभर वर्षात काही मोजक्या लोकांच्या आयुष्यात येतात. उदाहरणार्थ - नथुराम गोडसे आणि नाना आपटे, भगत शीह-राजगुरू आणि सुखदेव ,संभाजी महाराज आणि कवी कुलेश अशी काही मोजकी उदाहरणे आपल्याला सांगता येतील. असे मित्र थोर लोकांच्या आयुष्यात येतात आणि इतिहासात आपल्यासाठी एक सोनेरी पण ठेवून जातात. अश्या महान मित्रांच्या आयुष्यावर मी हि तीन भागांची मालिका लिहीत आहे सर्वात प्रथम म्हण मैत्री शंभू राजे आणि कवी कुलेश यांच्या गाढ आणि ह्रिदयस्पर्शी मैत्रीवर ! या दोघांच्या मैत्रीला जगात तोड असूच शकत नाही.
शंभू राजे आणि कवी कुलेश
-
शंभू राज्यांना शिवाजी  म्हराज्यांचा आदेश आला तुम्हाला भेटण्यासाठी उत्तर हिंदुस्थानातून २ आसामी आले आहेत त्यांना आपल्याकडे घेवून राजे आपल्याकडे येत आहेत. थोड्या वेळाने शिवराय त्या भगव्या वस्त्रातील दोन आसामींना घेवून शंभू राज्यांकडे आले.
" यांना आपण ओळखले का ?" महाराज्यानी एका असमिकडे बोट दाखवत विचारले.आणि त्या आसामिनी कमरेत वाकून मुजरा केला
."हे कविराज, कवी कुलेश " महाराज एका आसमिकडे बोट दाखवत म्हणाले.
"यांना कोण ओळखत नाही आग्र्याहून सुटका झाल्यावर यांनीच आपला जीव धोक्यात घालून आम्हास महाराष्ट्रात परत आणले होते" शंभू राजे
"युवराज हि मंडळी फक्त आपल्या भेटीसाठी आली आहेत आणि चार दिवस राहून परत जायचे म्हणत आहेत पण आम्ही आपले कविमन ओळखून यांना कायमचे इथेच ठेवू घेवू . तुम्हाला काय वाटते?" शिवाजी राजे. "आपला आग्रह रास्त आहे " शंभू राजे आपला झालेला आनंद दाबून ठेवत म्हणाले .
शिवाजी राजे त्याच्याकडे पाहून मनातच हसले. शिवाजी महाराज्यांची निवड होती ती चूकीची कशी असू शकते. आयुष्याच्या शेवटपर्यंत कवी शंभू राज्याच्या मागे अगदी सावलीप्रमाणे राहिले. हो कवी होतेच पण प्रसंगी शंभू राज्यांसाठी आपल्या हातात लेखणी सोडून तलवार पकडली.
          वयक्तिक आणि राजकीय स्वार्थासाठी आण्णाजी दत्तो सारख्या मणसाने संभाजी राजे बदनाम कसे होतील आणि शिवाजी महाराज आणि शंभू राजे यांच्यात जास्तीत जास्त दुरावा कसा होईल हे पहिले.प्रसंगी त्यांनी सोयरा बाई यांनाही हाताशी धरले .या डावात अण्णाजी दत्तो काही अंशी सफल झालेही पण शंभू राज्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले ते कविराज! असे म्हणतात वाईट  प्रसंगी आपली सावलीही साथ सोडते पण संभाजी राज्यांची सावली भक्कम होती. तिला लोभ ,मोह ,माया  या गोष्टीचा नामोनिशान नव्हता .
         संभाजी राजे तसे तापट स्वभावाचे त्याच्या रूपी रुद्रच जन्मला आला होता त्यांचा स्वभाव पाहता कोणाचे त्याच्याशी सहज पटेल असे शिवाजी महाराज्यानाही वाटले नसेल.संभाजी राज्यां  ी आपल्या ९ वर्ष्याच्या कालावधीत अनेक लढाया करून मुघलांना सलो कि पळो करून सोडले या काळात कविराज शंभू राज्यांकडे सावलीप्रमाणे उभे राहिले. बंधू ,सखा , आणि एक निष्ठावंत सेवक अश्यातीन भूमिका त्यांना पार पडायच्या होत्या.
        गणोजी शिर्क्यानी फितुरी केली वतनासाठी आपल्याच माणसाच्या पाठीत खंजीर खुपसले. संगमेश्वर ला दगा झाला. पकडले गेलेले मावळे कत्तलीसाठी एकत्र केले गेले. सामुहिक कत्तल केली गेली. शंभू राजे आणि कवी कुलेश यांना बांधून घेवून गेले.कोरेगावच्या शाही तलवार औरंगाजेबला शंभू राज्यांच्या अटकेची खबर मिळाली आणि त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो तडक निघाला शंभू राज्यांना पाहायला पण त्या अगोदर त्या धुर्त माणसाने आपल्या मौलाविकडून शंभू राज्याच्या मृत्यूचे प्रमाणपत वदवून घेतले .
        औरंगजेब संभाजी राज्यांपुढे उभा होता. आजवर त्याच्या नजरेला नजर द्यायची हिम्मत कोणताही झाली नव्हती पण संभाजी महाराज्यांची नजर तसूभर हि ढळली नाही .
"आखे निकाल दो इस काफर कि " औरंगजेब रागाने म्हणाला.आणि त्याने कापडाने बांधलेले तोंड सोडण्याची आज्ञा केली.
" सुवर् के औलाद, हम मराठा सेर जैसे जीते है और शेर जैसे मारते है!"तोंडावरील कापड सुटताच संभू राजे कडाडले.आजवर असा अपमान कोणी केला नव्हता औरंगजेबचा तो रागाने लाल झाला आणि म्हणाला "आखे निकालनेसे पहले इसकी जबान काट डालो.और ये सजाये पहले इस कवी पर आजमाओ " औरंगजेब निघून गेला पण कवी कुलेश यांना सजा करावी असे सांगून त्याने फार मोठा डाव खेळला होता . कवी कुलाशाना होणाऱ्या सजा पाहून शंभू राज्याच्या काळजाचा थरकाप होईल ते जीवाची भीक मागून मुस्लीम धर्म स्वीकारायला तयार होतील असे त्याला वाटले.पण औरंगेबाला माहित नव्हते मराठ्याचा हा छावा आपल्या आईच्या दुधाला जगणारा होता.कवी कुलाशानी एक नजर शंभू राज्यांवर टाकली कारण ते परत या डोळ्यांनी शंभू राज्यांना पाहू शकणार नव्हते.कवी कलशांची पहिली जीभ कापली गेली नंतर हशामानी त्यांचे डोळे काढले. आणि याच शिक्षा नंतर शंभू राज्यांना झाल्या एव्हड्या शिक्षा झाल्या तरी शंभू राजे आणि कवी कुलेश दयेची भीक मागत नाहीत हे पाहुन इखालास खान अजून चिडला त्याने नव्या दमाची हश्माची फौज आणली
" देखते क्या हो उखड दो इन कुत्तोकी खाल और डालो नमक का पाणी इन् काफरो पर" इखालास खान ओरडला हशम पुढे सरसावले त्यांनी दोघांची कातडी सोलून काढली आणि त्यावर मिठाचे पाणी टाकले पण दोघांनी आपल्या तोंडातून हू कि चू केले नाही.
         बाराव्या दिवशी सावलीने साथ सोडली कवी कुलेशांची प्राण जोत मावळली आणि नंतर शंभू राज्यांना भीमा इंद्रायणीच्या संगमावर देहाची विटंबना करून मारले. अशी हि गाढ मैत्री मृत्यू नंतर संपुष्टात आली पण मृत्यू च्या दारापर्यंत हि मैत्री अखंड होती अगदी मजबूत साखळदंडा प्रमाणे आज मात्र आम्ही त्या मैत्रीला ब्राह्मण मराठा वादात बदनाम करत आहोत. एव्हडेच मी म्हणेन.

1 comment: