असे का घडते?
मी नवीनच lg कंपनीत as सर्विस इंजीनीर म्हणून कामाला लागलो होतो. साधारण
संध्याकाळी ४ चा वेळ. माझे काम संपवून मी बोरिवली च्या ICकॉलोनितल्या एका
बगीच्यात time pass म्हणून बसलो होतो. मला इतिहासातील पुस्तके वाचण्याचा
खूप वेड नेहमी कोणता नं कोणता पुस्तक नेहमी माझ्या ब्यागेत असायचं त्या
दिवशी रंजीत देसाई यांचे स्वामी हे पुस्तक माझ्या जवळ होते. मी पुस्तक
वाचण्यात रमलो होतो.इतक्यात सेजार्च्या बाकावर एक वृद्ध जोडपे नुकतेच बसले.
"अहो तुम्हाला आठवते आहे आपल्या लग्नाच्या काही दिवसांनी आपण माझ्या
मामाकडे गेलो होतो तेव्हा नाही का जाताना आपण एका हॉटेलात सरबत प्यालो
होतो" आजी.
"त्या सरबताची आठवण आज तुम्हाला कशी आली?" आजोबा.
"खूप दिवसांनी आपण परत एकत्र सरबत प्यावे असे वाटते." आजी.
"पण पैसे ........?"आजोबा.
"अहो मी मागितले आहेत अजीतशी १०० रुपये उदया देतो म्हणाला." आजी.
"तुम्हाला किती वेळा सांगितले आहे मुलांशी पैसे मागत जाऊ नका "आजोबा.
"कोण परक्या माणसाशी थोडेच मागितले" आजी.
"पण ते पैसे देताना सरळ मनाने देतात का ? हे पहा माझ्याकडे १० रुपये आहेत शेवटचे, चला १० रुपयात एक फुल ग्लास येईल "आजोबा.
'नको हो ,मला सहज आठवण आली म्हणून म्हणाले ते १० रुपये सांभाळून ठेवा अडी नाडीला कामाला येतील."आजी.
"अहो चला जर उदया मी मेलो तर शेवट पर्यंत मला खंत राहील तुमची इच्छा पूर्ण नाही करू शकलो म्हणून." आजोबा उठत म्हणाले.
आजी नाईलाजाने त्याच्या सोबत गेल्या काही काल मी त्या पाठमोऱ्या आकृतीकडे
पाहत होतो.माझ्या मनात विचार आला म्हातारपणी सुख वस्तू दिसणाऱ्या या आई
वडिलाच्या नशिबी असे दिवस का यावे? कुठे गेली आपली संस्कृती 'मातृ-पितृ देवो भव
मानणारी ' या वृद्ध दाम्पत्याची अशी हालत होण्यास खरोखर यांचा मुलगा
जबाबदार आहे कि यांनी यांच्या मुलांना लहानापासून धर्म शिक्षण नाही दिले
त्याचे हे परिणाम आहेत.हि घटना खरी आहे.
No comments:
Post a Comment