कालमी fbवर एक लिंक पहिली 'भटांच्या चाट्यानो' अशी लिंक ओपन केली तर कोणी गजानन इंगोले या विक्षिप्त लेखकाने हा २० रु किमतीचा पुस्तक लिहिला होता.खाली फोन नं होता त्यावर मी फोन केला.

      काय हो साहेब तुमचा ब्राम्हणांवर एवडा राग का आहे.तुम्हाला असे नाही वाटत हिंदू धर्मात आपण एका सामाज्याला शिव्या देऊन दुफळी माजवत आहोत? तर त्याचे उत्तर असे दिले "ब्राम्हण हे परकीय आहेत आणि कुठेही प्राचीन पुस्तकात हिंदू धर्माचा उल्लेख नाही आहे हिंदू हि एक शिवी आहे जी परकीय आक्रमण करणारे लोक आपल्याला देत होते.त्यामुळे आम्ही हिंदू हा धर्मच मानत नाही." मग मी त्यावर त्यांना म्हणालो "मला सांगा त्यावेळी कोणता धर्म होता?" तर ते म्हणतात "त्यावेळी वैदिक धर्म होता जो ब्राम्हणांचा होता ."मग आपण मराठे त्या वेळी कोणत्या धर्मात येत होतो?"त्यावर ते म्हणाले "आपण शुद्र होतो."
"शूद्र हा धर्म होता का आणि तो मला कसा माहित नाही?" मी म्हणालो.
"शुद्र हा धर्म नाही जात होतो ."गजानन इंगोले.
"मग हि जात कोणत्या नं कोणत्या धर्मात येत होतीच ना?आणि मराठा हे क्षत्रिय होते ,शूद्र बोलून त्यांचा आपण आपमान करत आहात" मी जरा रागानेच विचारले त्यावर त्याने उत्तर द्यायचे टाळून आपण कुटले ?काय करता?आपल्याला ब्राम्हणांचा पुळका का?असे प्रश्न विचारायला सुरुवात केली.

नंतर मी त्यांना म्हणालो "काही कर्मठ ब्राम्हनांमुळे आपल्या मराठा समाजाला त्रास झाला पण आपण चांगल्या लोकांना का शिव्या देता बाजीप्रभू देशपांडे विनायक सावरकर यांना तुम्ही नवे का ठेवता आहे."
"बाजीप्रभू देशस्थ ब्राम्हण होते त्यामुळे ते शूद्र आहेत" गजानन इंगोले.
"काय विनोद करता राव"मी
माझे म्हणणे नं ऐकताच त्यांनी आपले पुरण चालू केले.
"सावरकर हे अति शहाणे होते त्यांनी त्याच्या सहा सोनेरी पाने' या पुस्तकात शिवाजी महाराजांचे राज्य म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला असे लिहिले आहे "गजानन इंगोले.
त्यांचे हे वाक्य संपते नं संपते तोच माझी मोबाईलची चार्जिंग संपली आणि फोन स्वीच ऑफ झाला .

मी घरी येऊन सहा सोनेरी पाने या पुस्तकातील पाचवा सोनेरी पान 'आले !मुसलमानी सत्तेचे कर्दनकाळ मराठे आले.'हा भाग दोन वेळा वाचून काढला.पण मला कुठेही कावळा बसायला आणि फांदी तुटायला असे वर्णन आढळले नाही
सावरकरांना जर आपल्या जातीचा गज वजा करायचा असता तर त्यांनी असे नसते का लिहिले 'आले !मुसलमानी सत्तेचे कर्दनकाळ ब्राम्हण पेशवे आले.'आणि सावरकरांना एवडा ब्राम्हणांचा पुळका होता तर त्यांनी क्रूरकर्मा टिपू सुलतान या लेखात नाना फडणीसांच्या कर्मठ ब्राम्हणी वृत्तीवर टीका केली असती का?

यावरून असे दिसून येते यांना मराठा सामाज्याची काही पडली नाही आहे यांना फक्त हिंदू धर्मात दुफळी माजवून वाद घालायचे आहेत आणि त्याचा फायदा राजकारणासाठी उठवायचा आहे.संभाजी महाराज असते तर या नाराधान्माना हत्तीच्या पायाखाली चिरडून मारली असती.
आता माझ्या काही ब्राम्हण मित्रांना मी सांगू इच्तो कि काही विक्षिप्त लोकांमुळे आमचा सर्व मराठा समाजाला दोष देवू नका माझ्यासारखे हिंदू धर्म अभिमानी हि या समाजात आहेत जे पहिले स्वत्ताला हिंदू मानतात आणि नंतर मराठा.ती लोक आपल्या अश्या वागण्याने हिंदू समाजापासून दूर जावू शकतात.

या विक्षिप्त लोकांविरोधात आवाज वूठवला पाहिजे पण शिवीगाळी नं करता आपले म्हणणे मुद्देसूद मांडून पुरावे देवून आपण या लोकांना उत्तर देवू शकतो लेखणी हि बंदुकीच्या गोलीपेक्षा जलद आहे पण तिचा वापर धर्म जागृतीसाठी करा
काही चुकले असल्यास मला टीप्पणी लिहून हिवा फोन करून कळवा
तुमाचा एक सच्चा हिंदू मराठा,
प्रशांत शिगवण.
०७४९८५५४१८४.