Wednesday, 14 September 2011

आमच्या हिंदू मुलीं मध्ये जिजाबाई का दिसत नाहीत?



मी फेस बुक वर  निरीक्षण केले आहे. एखाद्या हिंदुत्व्हा वादी ग्रुप वर addहोणाऱ्या मुलीं पैकी ७५ टक्के मुली २४ तासाच्या आत तो ग्रूप  सोडून गेलेल्या असतात.राहिलेल्या मुलीं पैकी एखाद दुसरी मुलगी ग्रुप वर कार्याषम असते याला कारण काय?मुली आपल्या धर्माबद्दल किती जागृत असतात.मी तुम्हाला माझ्या मित्राची गोष्ट सांगतो.
माझा मित्र एका मुसलमान लग्न झालेल्या विवाहतेच्या प्रेमात पडला.तिचे वय साधारण २० वर्ष असेल.तीन वर्स्या पूर्वी तिचे लग्न झाले होते दीड वर्ष्याची तिला मुलगी होती.नवर्याने तलाक दिले होते. ती आईच्या घरी राहत होती. आम्ही साऱ्या मित्रांनी त्याला समजावले.पण तो म्हणाला "तिला तिच्या नवर्याने सोडले यात तिची काही चुकी आहे का? तिला जगायचं अधिकार नाही आहेका? हे पहा तुम्ही माझ्या सोबत या नाहीतर नका येवू मी तिच्याशी लग्न करणारच! मी तिला पळवून न्यायाचा विचार केला आहे."
"अरे पण तिचा होकार आहे का?" मी त्याला विचारले.
  "हो, पण तिची एक अट आहे."मित्र.
"काय ?"मी
"तिने मला मुसलमान व्हायला सांगितले आहे."मित्रशांत पणे म्हणाला.
"काय?" मी आश्यार्याने म्हणालो.
"हो तिने मला मुसलमान बनायला सांगितले. आणि मला त्यात काही गैर वाटत नाही आहे.प्रेमात जात धर्म काय पाहायचे." मित्र.
"गाढवा वेड लागले आहे का तुला ?जर ती तुझ्यावर खरे प्रेम करते तर तिने तुझा धर्म हि स्वीकारला असता.तिचे तुझ्या पेक्षा तिच्या धर्मावर अधिक प्रेम आहे.आणि तुला तिच्याशी लग्न करून मुसलमान व्हायचे असेल तर खुस्याल हो मी त्यात अजिबात सहभाग घेणार नाही.आणि असे करण्या अगोदर धर्म वीर संभाजी राज्यानां आठव ज्यांनी आपले प्राण हिंदू धर्मासाठी दिले." मी रागानेच त्याला म्हणालो आणि तडक निघून गेलो.
त्या मुलाचे नाव सचिन होते मी 'एक्वा गार्ड' कंपनीत कामाला असताना माझ्या सोबत होता. त्याने लग्न केले पण तिच्याशी नाही एका हिंदू मुलीशी. त्याने त्या मुलीशी लग्न नाही केले कारण लग्न अगोदरच हि गोष्ट मी त्याच्या घरी फोन करून सांगितली आणि त्याच्या वडिलांनी १५ दिवसातच त्याचे लग्न करून टाकले .सांगायचे तात्पर्य एवढेच आमच्या हिंदू मुली किती धर्माबद्दल जागरूक असतात. किती मुली धर्माला प्राधान्य देतात? आज आम्ही जिजा बाईंना आदर्श मानतो पण आज आमच्या हिंदू मुलींमध्ये कधी आम्हाला जिजाबाई दिसतील.कधी आम्हाला त्यांच्यातील रणांगणा राणी लक्ष्मि बाई पहावयास मिळतील?असे घडेल कि हे माझे स्वप्न आहे जे मी भर दिवसा पाहण्याचे प्रयत्न करतो आहे.

1 comment:

  1. तसं पाहायला गेलं तर तुमचं बोलणं अगदी खरं आहे...
    मी तुमच्या मताशी अगदी सहमत आहे...

    मी हि किती तरी वेळा हा विचार केला आहे. आणि अनेक जणींना हा प्रश्न विचारला आहे,
    त्यावर त्यांचे म्हणणे असते कि, "कोण म्हणत आम्ही मुली धर्माच पालन करत नाही म्हणून...???"
    "आम्ही रोज घरी देवाची बत्ती लावून पूजा करतो,
    मंगळवार-गुरुवार-शनिवार उपवास करतो,
    ह्या दिवशी खास मंदिरात जाऊन येतो...."

    "मी हि उत्तरं ऐकून मनात म्हणालो, "फक्त हे करून धर्म पाळला जात नाही. त्याचा प्रसार करणं हे सुद्धा धर्म कर्तव्य आहे, हे कोण सांगणार ह्या मुलीना...???")
    मीही स्वतः एक ग्रुप चालवतो फेसबुकवर शिवाची महाराजांच्या नावाने, पण त्यात हि मुलींचा सहभाग नाहीच्या बरोबर असतो.
    आजच्या काळात आपण म्हणतो ना कि शिवाजी महाराजांसारखा राजा आता पुन्हा होणे नाही... ह्याचं हेच कारण आहे. जर आजच्या काळातल्या मुलींमध्ये कोणी जिजाबाईच नसतील तर शिवाजी महाराज जन्माला तरी येणार कसे...???

    ReplyDelete