Thursday 12 December 2013

तयारी अखंड हिंदूराष्ट्राची- भाग३


हिंदू धर्म हा सहिष्णू आहे. सर्व धर्मांचा आदर करणारा आहे मग हिंदू राष्ट्राचा अट्टाहास का असा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला ? तुम्हाला आठवतो आहे तो 'वीर सावरकर' चित्रपट ? नाही ना? कसा आठवेल असे चित्रपट पहायची सवयच नाही आम्हाला ठीक आहे मी त्यातला शेवट सांगतो

सावरकर म्हणतात "देश स्वतंत्र झाला देशाच्या नरड्यावर पाय ठेवून कोन्ग्रेस ने फाळणी मंजूर केली. कारण कोणाला आमदार बनायचे होते तर कुणाला खासदार! देशाची कुणाला काय पडली आहे. धर्म निरपेक्ष विचारधारा अशी काही रुजवण्यात आली कि सामान्य माणूस आपला धर्मच विसरून गेला.

धर्म म्हणजे अस्तित्व, धर्म म्हणजे संस्कार, धर्म म्हणजे समाजात जगण्याची एक सुंदर पद्धत! ज्या माणसाला धर्म नसतो त्याच्यात आणि पशुत काय अंतर? स्वत्ताचे अस्तित्व विकून आपण धर्म निरपेक्ष विचार धारणेत वाहून गेलेलो निर्जीव प्राणी आहोत याच्या उलट मुसलमान हे धार्मिक दृष्ट्या एकत्र राहिले. त्यामुळे त्यांच्या एकत्र मतदानावर लालची नेत्यांची नजर राहिली त्यांच्यासाठी लुभावाने वादे केले जावू लागले. सत्तेत आल्यावर त्यावर अंमल हि केला जावू लागला

देशात २०करोड मुसलमान ८० करोड हिंदुंवर भारी पडू लागले याला कारण काय? याला कारण एकच मुसलमान धार्मिक आणि राजकीय दृष्ट्या एक राहिले. आम्ही धार्मिक दृष्ट्या एकत्र येतो पण राजकीय दृष्ट्या विभागले जातो. त्यात आरक्षणाच्या नावाखाली आम्हाला राजकीय दृष्ट्या विभागने सोयीस्कर आहे हे मतलबी राजकारण्यांनी कधीच ओळखले आहे. आपल्या देशाचा बराचसा पैसा यांच्या विकासासाठी वापरला जातो.

जरा विचार करा आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा जर धार्मिक तत्वावर जसा पाकिस्तान बनला तसा हिंदुस्तान झाला असता आणि सार्या मुसलमानांना पाकिस्तानात पाठवले गेले असते आणि सार्या पाकिस्तानी हिंदुना हिंदुस्तानात घेतले असते तर? देशाचा वर्तमान आणि भविष्य कसा असता? अल्पसंख्यांक लोकांसाठी वापराला जाणारा करोडो रुपये हे गरीब मागासवर्गीय लोकांच्या कल्याणासाठी वापरले गेले असते. आत्ताच्या वेळी मुसलमान भारतात नसतेच मग राजकारणी गरीब मागासवर्गीय लोकांच्या मतांच्या लालसेने त्यांच्याकडे धावले असते. परिणामी दलित मागासवर्गीय लोकांचा विकास जोमाने झाला असता आणि देशात सार्या पार्ट्या आज जश्या आपण किती धर्मनिरपेक्ष आहोत त्यापेक्षा आपण किती हिंदुत्वादी आहोत हे दाखवण्यासाठी धड-पडल्या असत्या. आज- काळ चे नेते जसे अल्प संख्यांक मतांसाठी लालुचन करतात तसे ते हिंदू राष्ट्रात विकासासाठी केले असते परिणामी देश एक मजबूत महासत्ता असता.

धर्मनिरपेक्षपाणा म्हणजे दोन नावेत पाय ठेवणे आणि असा देश कधीच महासत्ता होऊ शकत नाहीच पण एक मजबूत विदेश नीतीहि वापरू शकत नाही आपल्या देशाची स्तिती हि एका अबले पेक्षा जास्त काही नाही.आता

मी वर दिलेली दोन्ही विधाने १) हिंदू धर्म हा सहिष्णू आहे.२) सर्व धर्मांचा आदर करणारा आहे. हि खोडून काढतो हिंदू धर्माचा धर्मग्रंथ हि भगवत गीता आहे त्यात भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे . धर्माशी धर्माने लढा आणि अधर्माशी अधर्माने लढावे. अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त अपराधी असतो. मला सांगा यात कुठे सांगितले आहे तुम्ही सहिष्णू राहा २) हिंदू धर्म हा सर्व धर्मांचा आदर करणारा आहे. राजकारणी सत्तेसाठी आपली आई हि विकायला कमी करणार नाहीत अहो जेव्हा महाभारत घडले तेव्हा इतर धर्मांचे अस्तित्वच नव्हते मग आपला धर्म इतर जे अस्तित्वात नसलेल्या धर्माचा आदरकर्ता होता हि शुद्ध थाप आहे.आपल्या एकतेची ताकत ओळखलीत तरच हिंदू राष्ट्र निर्मिती शक्य आहे.

1 comment: